पोस्ट्स

Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

बेवफा ८

इमेज
बेवफा ८        ओशाळून म्हणाला ," सॉरी मला माफ कर, मी तुला सुरभी समजलो." बस हे त्याचे शब्द त्याला इगळी डसल्यावणी भासले. म्हणजे मघापासून तुम्ही मला सुरभी समजत होता की काय ?"  तेवढ्यातच समोरून रिक्षा आली त्या रिक्षेला हात दाखवून ती रिक्षा थांबविली नि त्यात दोघेही बसले नि रिक्षा निघाली खरे ! परंतु प्राची साठी मात्र कुठंतरी हरवल्यागत एकदम गुपचूप बसली होती. ती कळत नव्हतं की हसावे की रडावे ?" पुढे       रिक्षा थांबली. तेव्हा दोघेही रिक्षेतून खाली उतरले पण त्यांना आता प्रश्न पडला होता की घरी काय सांगायचे म्हणजे पावसात भिजले कसे म्हणून विचारले तर ? रात्रीचे अकरा वाजले होते. दरवाजा वरील बेल वाजताच ऋषींच्या आई ने दरवाजा उघडला. दोघांनाही  भिजलेले पाहून त्याच्या आई ने विचारले , अरे तुम्ही दोघेही भिजले कसे ?" त्यावर ऋषी म्हणाला," छत्री सोबत नेली नव्हती. अचानक पाऊस आला नि  भिजलो आम्ही त्यात काय ." " अरे मग कुठं तरी थांबायचं होतं आसऱ्याला. पाऊस जाईपर्यंत वाट पहायची होती. एवढी काय घाई होती येण्याची !"    " अगं आ...

छत्रपती शिवाजी महाराज १४

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज १४          आमच्या आऊ साहेबांनी असले काही शिकविले. आम्ही सेवेकरांची कामे करायला जन्माला नाही आलोत. आमच्या      आऊ साहेब म्हणायच्या की भिकेचे डोहाळे लागले. त्यांनाच करू दे काय करायचे ते. आम्ही नाही करणार असंले काही !" असे बोलून फनकाऱ्याने त्या निघून गेल्या. तशा जाऊबाई उद्गारल्या की नवीन सूनबाई किती संस्कारी आणि आमच्या सूनबाई ह्या अश्या आपली सासूबाई काही रीतीचे सांगते आहे ते ऐकून घ्यावे  हे देखील ह्यांना जमेना झालंय कसं होणार ह्याचं ते देवच जाणो !" पुढे       पंतांनी शहाजी राजेंनी बनविलेला मसुदा विठोजी राजेंना दाखविला. मसुदा पाहून अंत्यंत खुश होत ते म्हणाले," पाहिलंत आमच्या दादासाहेबांनी बनविलेला मसुदा किती पद्धतशीर असतो. म्हणून आमचा मसुदा रद्द करून हा मसुदा मोहर लावून पाठवून द्या." काकासाहेबाना आपण तयार केलेला मसुदा आवडला म्हणून शहाजी राजे खुश झाले. पण जेव्हा पंत म्हणाले की , हा मसुदा थोरल्या साहेबांनी बनविलेल्या मसुदाची नक्कल नाहीये." असे सांगताच विठोजी राजे म्हणाले, ...

बेवफा ७

इमेज
बेवफा ७   " पण त्यासाठी बाहेर जाण्याची काय गरज आहे ?"    " कारण त्यांना कोणाकडून तरी असं समजलं आहे की आपल्या दोघांमध्ये पती पत्नी सारखे नाते नाहीये."   आता इथून पुढे    " काय सांगतेस ?"    " खरं तेच सांगतेय." प्राची उद्गारली. ऋषी ला एकदम टेंशन आलं की,   " मग आता काय करायचं ?" प्राची पण मुद्दामच म्हणाली, " त्यांच्या समोर नाटक तर करावं लागेल की आम्ही दोघेही आदर्श पती- पत्नी आहोत, तुम्ही समजता तसं नाहीये. तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे." ऋषी शेवटी नाईलाजाने म्हणाला की ," ठीक आहे, चल जाऊ चित्रपट पाहायला." प्राची एकदम खुश झाली. तिच्या मना सारखे झाले. खरे तर ही आयडिया तिच्या सासू ने तिला दिली होती. काही वेळा पूर्वी म्हणजे तिचा नवरा ऋषी कामावरून येण्याच्या अगोदर तिच्या बेडरूम मध्ये तिची सासूबाई आल्या होत्या. त्या तिला म्हणाल्या," सुनबाई, जर तुला असं वाटत असेल की तुझा नवरा त्या सटवी ला विसरून तुझ्या जवळ यायला हवा असेल तर तुलाच  त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. " त्यावर प्राची ने न समजून विचारले, ...

छत्रपती शिवाजी महाराज १३

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज १३        पण तुम्हाला पटत नसेल तर जाऊ दे. कालांतराने तुम्हाला कळेलच की आम्ही सांगत होतो ते कुणाच्या भल्यासाठी ! " असे म्हणताच विठोजी राजेंच्या मनात नको नको ते विचार येऊ लागले आणि ते स्वतःशीच बोलले की आम्ही असं होऊ देणार नाही म्हणून. मध्ये रत्यात मलिक अंबर भेटला त्यांनी सांगितले की आम्हाला देखील पाहुण्याचे स्वागत करण्याची संधी द्या. पुढे     लखुजी जाधवांचे म्हणणे असते की जिजाबाईंनी आपल्या सोबत सिंदखेडला चालावे. कारण त्या अजून वयाने  लहान होत्या. परंतु म्हाळसा बाईचे म्हणणे असते की नाही त्यांनी आता वेरुळ ला म्हणजे आपल्या सासरी राहावे. उमाबाईचे म्हणणे असते की त्यांनी अजून माहेरीच राहावे. शेवटी असे ठरले की हा निर्णय जिजाबाईंनीच घ्यावा की त्यांनी कोठे राहायचे . त्यानंतर जिजाबाईंना बोलवण्यात आले तेव्हा त्यांच्या सोबत त्यांच्या मधल्या नि धाकट्या आऊ साहेब पण आल्या. पण जेव्हा लखुजी जाधवांनी जिजाबाईंना विचारले की तुमचा विचार काय आहे, म्हणजे तुम्ही आमच्या सोबत सिंदखेडला चलणार का वेरुळला ? " त्यावर जिजाबाई म्हणाल्या की मधल्या आऊ ...

बेवफा ६

इमेज
बेवफा ६           " निर्णय चुकला खरा, पण या पुढे तो सुधारायचा मी प्रयत्न करीन. अर्थात प्रकाश ला मी आपलासा करण्याचा प्रयत्न अवश्य करीन." सुरभी असं मुद्दाम म्हणाली. कारण तिला माहीत होतं प्रकाश चं दुसऱ्या मुलीवर अफेर सुरू आहे ते. आणि तिला पण त्याच्याशी कुठं संसार करायचा आहे,माझं प्रेम फक्त तुझ्यावर आहे माझं ऋषी ! मी दुसऱ्या कोणाची होऊ इच्छित नाही. परंतु ती हे ऋषी ला सांगू शकत नव्हती , म्हणून ती तशी बोलली.     " मग मीही प्रयत्न जरूर करीन. प्राची ला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा "    " व्हेरी गुड ! मला हीच अपेक्षा होती तुझ्याकडून." आता इथून पुढे    असे त्याने सुरभी ला आश्वासन दिलं खरं , पण त्याच्या मनात एकच विचार घोळत होता की प्रकाश सुरभी च्या भावनांशी खेळत आहे, त्याचं अफेर दुसऱ्या कुण्या मुलाशी आहे, पण हे सुरभी ला का कळत नाहीये. अचानक त्याच्या मनात एक विचार आला की, असं तर नाही ना ? सुरभी ने केवळ माझा प्राण वाचविण्यासाठी प्रकाश शी लग्न केलं असेल. हो असेच आहे, म्हणून तर तिच्या नवऱ्याचे अफेर दुसरीकडे सुरू अस...

छत्रपती शिवाजी महाराज १२

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज १२     दुसऱ्या दिवशी वेरुळ कर मंडळी पुन्हा वेरुळ ला परतली. त्यानंतर दोन्ही ठिकाणी लग्नाच्या जोरदार तयारीला सुरुवात झाली. लखुजी जाधवाणी गोमाजी ला आदेश दिला की आपण सारे दौलताबाद असू तेव्हा इथला बंदोबस्त काही विश्वासू माणसावर सोपविण्यात आला. दाग दागिने कपडे लत्ते सर्वकाही संदुकित भरले गेले. पुढे      लखुजी जाधवाचे सारे कुटुंब रेणुका माते समोर एकवटले. लखुजी जाधवाणी रेणुका मातेचा सांगणे केले की हे शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे. त्यानंतर सर्व मंडळी दौलताबादला निघाले. वेरुळ       उमाबाई शहाजी राजे ना काही महत्त्वाच्या गोष्टी समजवितात. तेव्हा प्रामुख्याने लग्न झाल्यानंतर तुमच्या काय जबाबदाऱ्या आहेत त्या विषयी सांगताना त्या म्हणतात की लग्न म्हणजे तुमच्यावर एक मोठी जबाबदारी येणार आहे, तुमची भर्या ही आता तुमची जबाबदारी असणार आहे."    " पण त्या तर खूप मोठ्या आहेत. कुक्कुल बाळ नाहीत काही."    " हो मान्य पण  त्या आपले घर सोडून तुमच्या कडे येणार आहेत त्या कोणाच्या विश्वासांवर केवळ आम...

षड्यंत्र ३०

इमेज
षड्यंत्र ३०      " बरं ठीक आहे .थोडी विश्रांती घेऊ नि मग पळू." म्हणून थोड्या वेळ विश्रांती साठी एका दगडावर बसले.पण तेवढ्यात चंदन चे साथीदार तिथपर्यंत येऊन पोहोचले. पळण्याचा प्रयत्न करत असताना त्या लोकांनी त्या तिघांना घेरले. मग ठरविले की आता ह्यांच्या शी लढायचेच.असा विचार करून त्यांच्याशी मारामारी सुरू केली.पण एकटा किती जनाशी टक्कर घेणार. शेवटी त्या तिघांना ही पकडकेच. तेवढ्यात तिथं चंदन मोटार घेऊन तेथे आला. त्या तिघांना मोटारीत घालून आपल्या घरी आणले. पूढ़े     बाबूराव चा एक साथीदार बाहेर उभा होता. त्याने पाहिले की चंदन त्या दोघांनाही सोबत घेऊन आलाय तेव्हा तो आंत मध्ये गेला नि त्याने बाबुराव ला चंदन त्या तिघांना घेऊन माहिती दिली तसा बाबुराव चंदनच्या आई ला नि बहिणीला घेऊन बाहेर आला. तिकडून चंदन ने मधुराबाई  प्रेम आणि लीला ला पाठवून दिले  नि इकडून बाबुराव ने चंदनच्या आईला नि बहिणीला त्याच्या कडे पाठविले . कोणी चलाखी करू नये म्हणून  दोघांच्या ही साथीदारांनी एकमेकांवर बंदुका रोखून धरल्या होत्या. प्रेम आणि मधुरा बाई बाबुराव जवळ येताच ब...