Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

पंखरूपी मानव १

पंखरूपी मानव १
पंखरूपी मानव १

 

     ( ही कथा संपूर्ण काल्पनिक आहे , तंत्रज्ञान वर आधारित. केवळ वाचकांच्या मनोरंजनासाठी लिहिली आहे. ह्या कथेतील पात्र ,स्थळ, घटना ,सर्वकाही काल्पनिक ह्या कथेचा वास्तव्याशी काही संबंध नाही.  या पूर्वीचे दोन भाग म्हणजे बॉडीलेस नंबर १ व २ वाचले असेलच ते वाचकांना फार आवडलले म्हणून हा तिसरा भाग लिहीत आहे.  नम्र विनंती आहे की केवळ रेेटिंग न देता समीक्षा जरूर लिहावी चांगली वाईट जी काय द्यायची असेल ती द्या. एक गोष्ट द्यानात असावी  की ही केवळ कल्पना आहे. त्यात वास्तविकता शोधू नका. )

       ( एक विज्ञान कथा )

      डॉ. विश्वजित आणि त्यांचे दोन असिस्टंट जॉन आणि सलीम ह्यांना कोर्टाने निर्दोष करार देऊन भारत देशाचे थोर वैज्ञानिक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. वृत्तपत्रा नी
त्यांचा जास्तच उदो उदो केला. त्यामुळे साऱ्या जगात त्यांची
आणि त्यांनी बनविलेल्या बॉडीलेसच्या करनाम्याची सर्वत्र खबर पोहोचली. त्यामुळे त्यांना सर्व देशातून आमंत्रित करण्यात आले. कारण त्यांनी बनविलेला फर्म्युला त्यांना ही
पहायचा होता. आणि त्याना तसाच फर्म्युला बनहून पाहिजे
होता. त्यासाठी लागेल तेवढी किंमत मोजायची तयारी होती
त्यांची. जॉन आणि सलीम फार खुश झाले. ते डॉ. विश्वजित
ला म्हणाले , " चला डॉक्ट, आता आपण मालामाल होऊ."
  डॉ. विश्वजित : मालामाल होऊ काय ? आपण बनविलेल्या
बॉडीलेसचा दूर उपयोग कशावरून करणार नाहीत ते."
जॉन : पण आमंत्रण तर आलंय ना ?
सलीम :  हां डॉक्टर आता न जाऊन चालणार पण नाही."
डॉ. विश्वजित : म्हणूनच म्हणतोय कुणाला कळायच्या अगोदर आपण दूर कुठंतरी जाऊ. जिथं आपल्याला कुणी
ओळखणार नाही."
जॉन : पण अशी जागा आहे का कुठे ?"
डॉ. विश्वजित : हो ,आहे अशी एक जागा."
सलीम : कुठं ?"
डॉ. विश्वजित : माझं गावं."
जॉन : नाणार ."
सलीम : पण ते गाव तर सर्वांच्या परिचयाचे आहे."
डॉ. विश्वजित :  असेल ;  परंतु ते एक खेडे गाव आहे.
तिकडे कुणाचे ही लक्ष जाणार नाही."
जॉन : पण तेथे जाऊन करणार काय आपण ?"
डॉ. विश्वजित : संशोधन ."
सलीम : म्हणजे ?"
डॉ. विश्वजित : पुन्हा  बॉडीलेस तयार करून त्याला अंतराळात पाठवायचा."
जॉन : कशासाठी ?"
डॉ. विश्वजित : अंतराळात कशासाठी जातात संशोधक ?
सलीम : संशोधन करण्यासाठी !"
जॉन : पण बॉडीलेस कशाचे संशोधन करणार ?"
डॉ. विश्वजित : सर्वात अगोदर म्हणजे तो माझ्या वडिलांचा
अंतराळात शोध घेणार."
सलीम : अंतराळात तुमचे वडील कसे असू शकतील ?"
डॉ. विश्वजित : वीस वर्षापूर्वी ते पंखाच्या मदतीने अंतराळात
गेले ते अद्याप परतले नाहीत. म्हणजे त्यांची डेडबॉडी  सुध्दा
सापडली नाही."
जॉन :  म्हणून तुम्हाला वाटतं ते जिवंत असतील."
डॉ. विश्वजित : शक्यता आहे."
सलीम : अशक्य आहे."
डॉ. विश्वजित : ह्या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये.
फक्त प्रयत्न करायला हवा. मला म्हणावयाचे आहे, पृथ्वी सारखा दुसरा ग्रह असण्याची शक्यता आहे. आणि तिथंही
पृथ्वीवर जशी जीवमात्रा आहे, तशीच असण्याची शक्यता
आहे. पौराणिक कथा मध्ये तसा उल्लेख आहे. तिन्ही लोकांचा स्वामी असे म्हटले जाते. एक पृथ्वी, दुसरं पाताळ ,आणि तिसरे देव लोक , हे तर सर्वाना माहीत आहेच ; पृथ्वी सोडून पातळ नि देवलोक कुठं आहे, ते माहीत नाही. राक्षस पाताळात राहतात, असे आपण म्हणतो. परंतु ऑक्सिजन शिवाय ते जगू शकतात का ? "
जॉन : नाही."
डॉ. विश्वजित : याचा अर्थ तेथे सुध्दा पृथ्वी  प्रमाणे ऑक्सिजन असणार.
जॉन : शक्य आहे. "
डॉ. विश्वजित : म्हणून आपल्याला अश्या ग्रहांचा शोध घ्यायचा आहे ,की तिथं पृथ्वी सारखी जीवमात्रा असेल."
जॉन :  अमेरिका अश्याच ग्रहांचा शोध कित्येक वर्षे घेत आहे,परंतु अद्याप त्याना यश आलेले नाहीये."
डॉ. विश्वजित : म्हणूनच आता आपण शोध घ्यायचा आहे.
कारण अंतराळात असे असंख्य ग्रह आणि तारे आहेत त्यांचा
अद्याप संशोधकांना शोध लागलेला नाहीये. म्हणून आपण
तो शोध घेऊ."
जॉन : पण त्यासाठी बॉडीलेसच का ?"
डॉ. विश्वजित : कारण आपला बॉडीलेस अडव्हास रोबट
आहे. त्याला ऑक्सिजन ची गरज नाहीये. म्हणून तो कुठं ही
नि कसा ही पोहोचू शकतो.
सलीम : पण बॉस , त्याला ऑक्सिजन ची गरज नाही; परंतु
विद्युत पॉवर लागेल ती अंतराळात कुठून मिळणार.?
डॉ. विश्वजित : त्यासाठी ही उपाय आहे ,माझ्याकडे."
जॉन : कोणता ?"
डॉ. विश्वजित : सूर्य ऊर्जेवर त्याची बॅटरी आपोआप च चार्ज
होणार. त्यामुळे त्याला दुसऱ्या विद्युत पॉवर ची गरज भासणार नाही."
जॉन : अरे वा ! हे तर फारच उत्तम झाले."
डॉ. विश्वजित : सर्वात प्रथम आपण इथून पलायन करू."
जॉन : हो." त्यानंतर रात्रीच्या कोकण कन्या एक्स्प्रेस ची तिकीट काढून त्या गाडीत बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी
गाडी राजापूर रोड ला पोहोचली. हे तिघेही गाडीतून खाली
उतरले नि स्टेशनच्या बाहेर आले. तर च एस टी आलेलीच होती त्यात हे तिघेही चढले. नि कंडक्टर कडून राजापूर डेपोची तिकीट काढली. आणि तिचेही तीन माणसाच्या एका सीट वर बसले. तासा भरात राजापूर डेपोत गाडी पोहोचली.
त्यानंतर एस टी आगारात बसून नाणार गावची एस टी वाट पाहू लागले. अकरा वाजता नाणार गावची एस टी आली.
त्यात हे तिघेही चढले. थोड्या वेळाने गाडी स्थानकातून सुटली. तश्या त्या तिघांच्या गप्पा रंगल्या. तेव्हा जॉन बोलला, बॉस  एक विचारू ?"
डॉ. विश्वजित : अवश्य विचार ."
जॉन : आपण तुमच्या गावात आलोय खरं , पण संशोधन
करता येईल का गावात ?"
डॉ. विश्वजित : का नाही येणार ? तुला माहितेय माझ्या वडिलांनी
ह्या गावातच संशोधन करून सूर्यप्रकाश च्या ऊर्जेवर चालणारे जेट विमान बनविले होते."
जॉन : हो ; पण अंतराळात गेले ते परत आलेच नाही हो ना ?"
डॉ. विश्वजित : त्याचाच तर शोध घ्यायचा आहे ,आपल्याला."
जॉन : तुम्हाला काय वाटतं इतकी वर्षे अन्नपाण्या शिवाय जिवंत राहिले असतील का ते ?"
डॉ. विश्वजित :  कदाचित नाही. परंतु समज ते दुसऱ्या दुनियेत
जाऊन पोहोचले असतील तर !"
सलीम : पण दुसरी दुनिया खरंच असेल का ?"
डॉ. विश्वजित : ह्या विश्वात असंख्य गृह , तारे आहेत. आणि त्यातील कित्येक ग्रहांचा , ताऱ्याचा अद्याप शोध लागलेला
नाहीये. त्यामुळे पृथ्वी सारखा सजीव जीवमात्रा असलेला गृह असू शकतो ना ?"
जॉन : शक्यता नाकारता येत नाही."
सलीम : पण मी काय म्हणतो अमेरिका सारखा देश कित्येक वर्षे संशोधन करताहेत , त्याना नसता सापडला असता असा ग्रह ?"
डॉ. विश्वजित : त्यांचा तर प्रयत्न सुरू आहेच की पृथ्वी सारखा
सजीव जीवमात्रा असलेला ग्रह शोधून काढावा. आणि त्यावर
पूर्ण अमेरिका वसवावी. त्यानंतर पृथ्वी अणुशक्ती बाँब च्या साह्याने पृथ्वी वरील जग नष्ट करावे. म्हणून  प्रथम चंद्रावर जाऊन पाहिले. तेथे वस्ती करता येईल का ?  परंतु नाही
जमले. कारण तेथे पृथ्वी सारखे वातावरण नाही, गुरुत्वाकर्षण नाही, त्यामुळे तेथे उड्या मारत चालावे लागते.
आणि मुख्यतः तेथे पाणी नाही. त्यानंतर त्यांनी मंगळ ग्रहावर
ही जाऊन पाहिले. पण तेथे ही तीच परिस्थिती म्हणून प्रत्येक
ग्रहावर जाऊन संशोधन करताहेत. मग आपण का करू नये ? शिवाय आपण जी टेक्नॉलॉजी वापरणार आहोत तशी
टेक्नॉलॉजी अद्याप कोणी वापरलेली नाहीये."
सलीम : पण खरंच शक्य होईल का हे ?"
डॉ .विश्वजित : प्रयत्न करायला काय हरकत आहे ? आणि एक
गोष्ट नेहमी लक्षात ठेव ती ही की प्रयत्न केल्या शिवाय इथं
काहीही सद्य होत नाही. आतापर्यंत जे शोध लागले आहेत
ते प्रयत्नाणेच लागले आहेत. तेव्हा प्रयत्न करणे फार महत्वाचे. कारण कोणीतरी असे म्हटले आहे की, प्रयत्न वाळू चे कण रगडीता त्यातून तेल ही गळे. याचा अर्थ तोच आहे , प्रयत्न कर. बाकी इश्वरावर सोडून दे. फळ द्यायचे काम त्याचे
आहे."
जॉन : सर,तुम्ही इश्वरला मानता ?"
डॉ. विश्वजित : आफकोर्स !"
जॉन : परंतु वैज्ञानिक लोक ईश्वराला मानत नाहीत."
डॉ.विश्वजित : कारण ते स्वतःला ईश्वर मानतात."
जॉन : मग काही चुकलं का त्यांचं ?"
डॉ.विश्वजित : येस."
जॉन : कसं ?"
विश्वजित : आम्ही एखादा शोध लावतो नि गर्वाने फुलून
जातो. आणि स्वतःला ईश्वर समजू लागतो. परंतु ज्या
विधात्याने ही संपूर्ण सृष्टीची रचना केली. आणि त्या मध्ये
त्याने एक सुध्दा चूक नाही केली. तो केवढा मोठा असेल
सायंटिस्ट जरा कल्पना करा. ज्याला आपण सूर्य म्हणतो
ज्याने साऱ्या ब्रम्हांडाला प्रकाश दिला आहे, आणि त्याचं
कोणाला बिल ही भरावे लागत नाही. शिवाय कधी बंद ही पडत नाही. आम्ही माणसांनी निर्मिलेली उपकरणे कालांतरा ने बंद पडतात. आणि विधात्याने निर्मिलेले कोणतेही उपकरण कधी ही बंद पडत नाही. मग मला सांग सर्वात मोठा सायंस्टिट  कोण आम्ही का ईश्वर  ?"
सलीम : अर्थात ईश्वर ."
डॉ. विश्वजित : म्हणून प्रयत्न सोडू नये. एक दिवस ते प्रयत्नच यशाच्या शिखरावर घेऊन जातात."
जॉन : ते सर्व खरं पण .....?
डॉ.विश्वजित : पण काय ?"
जॉन : नाही म्हणजे मला असं म्हणायचंय आहे,की तुमच्या
वडिलांना अंतराळात जाऊन वीस वर्षे झाली. अजून
परतले नाहीत म्हणजे आहेत कोठे ते ?"
डॉ. विश्वजित : समज आपल्या देशात कोणी परकीय घुसखोर घुसला तर त्याचं काय करतो आपण ?"
जॉन: त्याला पकडून तुरुंगात टाकतो आपण."
डॉ. विश्वजित : एक्सझटली ! हेच झाले असेल त्यांच्या सोबत."
सलीम : म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की , तुमचे बाबा दुसऱ्या जगात पोहोचले आहेत. आणि तिथल्या
राहणाऱ्या लोकांनी त्याना कैद करून ठेवले असेल."
डॉ. विश्वजित : आँबेसली !"
जॉन : पण मी काय म्हणतो , अमेरिका सहित इतर देश ही
अजूनपर्यंत तेथे पोहोचू शकले नाहीत. तेथे तुमचे बाबा पोहोचले असतील."
डॉ. विश्वजित : आफकोर्स ! कारण त्यांच्याकडे सुर्या ऊर्जेवर चालणारे जेट विमान होते. अर्थात ते कीहीही उंचावर जाऊ
शकतात. इंधन संपण्याचा प्रश्नच येत नाही. कारण सूर्य मावळत ही नाही आणि उगवत ही नाही.फक्त आपल्याला तसा भास होतो. कारण पृथ्वी स्वतः  सभोवती फिरते म्हणून
दिवस आणि रात्र होते. परंतु अंतराळात ना दिवस ना रात्र
अर्थात सूर्याची ऊर्जा कायम मिळणार जेट विमानाला."
जॉन : हां ते ठीक आहे, परंतु अन्न पाण्याशिवाय इतके दिवस
माणूस जिवंत कसा राहू शकणार ?"
डॉ. विश्वजित : तुला काय वाटतं अंतराळात जाणारे वैज्ञानिक
काय स्वतः सोबत जेवण घेऊन जातात.? "
जॉन : ते माहीत आहे हो, भुकेवरील आणि तहानेवरील  टॅबलेट घेऊन जातात."
डॉ. विश्वजित : एक्सझटली ! माझ्याही वडिलांनी तेच केलं असेल."
जॉन : ठीक आहे, ते पण मानलं. पण ऑक्सिजन तो
किती दिवस पुरणार ? म्हणजे एक ना एक दिवस संपणारच
ना ?  शिवाय तो पृथ्वी शिवाय दुसरी कडे मिळणार नाही."
डॉ. विश्वजित : हां हे बोलू शकतोस तू ; परंतु असं पण तर होऊ शकते ना ? म्हणजे बाबा ज्या गुहावर पोहोचले. त्या ग्रहावर
पृथ्वी प्रमाणेच वातावरण असेल तर ?"
सलीम : येस ! असेच झाले असणार. म्हणून ते पुथ्वीवर आले
नाहीत ना त्यांचे ते जेट विमान."
डॉ. विश्वजित : एक्सझटली ! मला हेच म्हणावयाचे आहे."
जॉन : मग आता काय करण्याचा विचार आहे तुमचा ?"
डॉ. विश्वजित बोलणारच होते. एवढ्यात कंडकटर ने बेल
मारली नी म्हटलं ," चला नाणार गाव आला. नाणार गाववाले खाली उतरा. " तसे तिघेही आपले सामान घेऊन खाली उतरले. तेव्हा जॉन ने विचारले ," आता जायचं कोठे ? म्हणजे तुमचे घर वगैरे काही ना आता येथे ?"
डॉ. विश्वजित : इथे माझे  घर नसले म्हणून काय झाले ?
ह्या गावचे पोलीस पाटील तर आहेत. शिवाय शाळा मास्तर
गोडबोले सर, ते मला नक्कीच राहायला सोय करून देतील."
चालत चालत पोलीस पाटील च्या घरी आले. बाहेरून
पाटील ना आवाज देताच ते बाहेर आले नि डॉ. विश्वजितला
अचंबित नजरेने पाहतच राहिले. त्याना स्वतःच्या डोळ्यावर
विश्वासच बसेना की आपल्या गावातील वेडसर मुलगा एवढा
मोठा सायंस्टिट झाला नि आपल्या गावाला अद्याप विसरला
नाही. त्याना  अगोदर वाटले की आपण स्वप्न पाहत आहे,त्यांनी स्वतःलाच एक चिमटा काढून पाहिला. पण डॉ.
विश्वजित असल्याची खात्री होताच ते आदराने म्हणाले ," तुम्ही डॉ . विश्वजित ना ?"
डॉ. विश्वजित : हो , मी विश्वजित च."
पाटील : कसा आहेस पोरा ?"
डॉ. विश्वजित : एकदम मस्त ,पण तुम्ही कसे आहात ?"
पाटील : आमचं काय आता वय झालं कधीतरी डोळे झाकणारच. परंतु तू आपल्या गावाचं नाव काढलेस बाबा."
डॉ. विश्वजित : आपल्या सर्वांच्या आशिर्वाद ने ते शक्य झालं."
पाटील : बैस ! पाटलीन बाईला चहा टाकायला सांगतो."
असे म्हणून ते पाटीलिन ला हांक मारतात. पाटलींन बाहेर
येथे पण पाहुण्यांची ओळख न पटल्याने तिने विचारले,
     " कोण पाहुणे म्हणायचे ?"
     " तू ह्याला ओळखले नाहीस  ?"
     "  नाही."
     " अगं आपल्या गावचा विश्वजित नाही का ? त्याला तुम्ही
लोकांनी वेडा ठरविले होते. तो पुढे मोठा शास्त्रज्ञ बनला."
      तेव्हा तिच्या लक्षात आले तशी ती हसून म्हणाली, अगंबाई ओळखले च नाही मी त्याला. कसा आहेस रे ?"
डॉ. विश्वजित : एकदम मजेत आहे."
पाटलींन : तसाच मजेत रहा हो."
पाटील : त्यांच्यासाठी चहा ठेव."
डॉ. विश्वजित : पाटील काका गोडबोले सर आहेत का अजून ? का त्यांची बदली झाली ?"
पाटील: नाही नाही आहेत, बोलवायला पाठवू का माणूस ?"
डॉ. विश्वजित : नाही. नको. ते सर आहेत माझे. ते मला
भेटायला येण्या एवढा मी मोठा नाही झालो. मी जाईन त्याना
भेटायला."

क्रमशः



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३५ | Mahabharat part 135 | Author : Mahendranath prabhu.