Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

महाकाल ३

महाकाल ३
महाकाल ३

 

         दरवाजा वरील बेल वाजताच राधाबाईंनी दरवाजा
उघडताच समोर त्यांना विवेक दिसला. त्या आपल्या मुलाकडे आश्चर्याने पाहतच राहिल्या. तसा विवेक म्हणाला," आई , अशी काय पाहतेस माझ्याकडे ? मघाशी पप्पा पण तसेच मला टाकून पळून आले, मी काय तुला भूत दिसतोय की काय ? बघ माझे पाय उलटे आहेत का ?" तश्या त्या हर्षभराने म्हणाल्या," नाही रे बाळा ! मी त्या साठी पाहत नव्हती रे तुझ्याकडे. माझा स्वतःलावरच
विश्वास होत नाहीये की माझं बाळ जिवंत आहे ते." असे
म्हणून त्यांनी त्याला स्पर्श करून पाहिलं नि मग म्हणाल्या," पण आता खात्री पटली हं मला. ये घरात." असे म्हणून त्या बाजूला झाल्या. तसा विवेक आंत आला तेवढ्यात त्याचे वडिलांनी अर्थात गोपाळरावांनी  आंतूनच विचारले," अगं कोण आलेय बाहेर ?" असे म्हणतच ते म्हणतच बाहेर आले नि समोर विवेक ला त्यांची बोबडीच
वळली. पण तरी देखील हिंम्मत त्यांनी  आपल्या पत्नीला
विचारले की,  अगं कोणाला घरात घेतलंस ते कळतंय का
तुला ?"
     "  कुणाला म्हणजे मी माझ्या मुलाला घेतलंय घरात."
     " अगं तो आपला विवेक नाहीये."
    "  अहो, पप्पा असं काय बोलताय ? मी विवेकच आहे."
    " तू खरंच विवेक आहेस का ?"
    " का विश्वास नाही तुमचा माझयावर ?"
    " तसं नाही रे "
    " मग कसं ?"
    " तू जिवंत आहेस तर डॉक्टर असं का सांगितले ?"
    " तसं होतं कधी कधी ! म्हणजे विज्ञान मध्ये आहेत
त्याचे पुरावे. म्हणजे कधी कधी काय होतं की हृदय
अचानक बंद पडतं , मग लोक समजतात की हा मनुष्य
मृत वापला. त्याला नेऊन जाळतात. किंवा त्या अगोदरच
त्याचा प्राण वापस आला तर तो उठून बसतो. पण लोकांना काय वाटते की एकदा मेलेला मनुष्य पुन्हा जिवंत
कसा होईल ? असे समजून ते त्याला भूत समजतात.
पण मला सांगा भूताला शरीर असते का हो ? आणि लगेच कसा काय मनुष्य बनेल बरं ? काहीतरीच असतं लोकांचं.
त्या शिवाय भुताचं शरीर एकदम थंड असते. माझं शरीर थंड आहे का ते पहा. हात लावून खात्री करून घ्या." असे  म्हणताच गोपाळरावांनी विवेकच्या शरीराला भीत भीतच स्पर्श करून पाहिलं तर त्याचे शरीर गरम लागत होते. तेव्हा त्यांची खात्री झाली की हा आपला मुलगा विवेकच आहे. तशी त्यांनी त्याला मिठी मारली. तेव्हा राधाबाई उद्गारला," आता तरी खात्री पटली."
    " हो गं खरंच आपला हा विवेक आहे."
     " विवेक आधी हे कपडे काढून टाक बरं. मेलेल्या
माणसांना घालतात हे कपडे."
    " हो, आता काढून टाकतो. " असे म्हणून तो बाथरूम
मध्ये शिरला. आणि थोड्या वेळाने तो बाथरूम मधून
बाहेर आला नि सरळ आपल्या बेडरूम मध्ये शिरला. तेव्हा त्याने पाहिले की सौंदर्याने रडून रडून आपले डोळे सुजविले होते.हातात बांगड्या नाहीत.भागांत सिंधुर नाही.
कपाळावर कुंकू नाही.तो तिच्याकडे पाहत म्हणाला, " अगं तू पण मला मेलेला समजतेस की काय ? अंगावरील
सर्व श्रुंगार उतरवून टाकलास तो." सौंदर्या आश्चर्यचकीत
होऊन ती त्याच्याकडे पाहतच राहते. जणू  हे स्वप्न तर
नव्हे ना ? असा विचार तिच्या मनात आला , म्हणून ती
स्वतःला चिमटा काढून पाहते. तेव्हा तिला जाणीव होते
की हा भास नाहीये. खरोखरच विवेक आलाय.मला तिला
इस्पितळात झालेला प्रसंग आठवला. म्हणजे माझा विवेक
जिवंत आहे तर ! असे म्हणून हर्षभराने ती उठली नि पळतच येऊन विवेक ला बिलगली. त्यावेळी विवेक ने कमरेला फक्त टॉवेल गुंडाळले होते. ते सुटले.पण त्याने ते लगेच पकडले. तशी सौंदर्या हसायला लागली. विवेक पुन्हा कमरेला टॉवेल घट्ट गुंडाळले नि तिला आपल्या पासून दूर करत म्हणाला," हसतेस काय ? आणि
हा विधवा स्त्री चा वेष का धारण केलास." असे म्हणताच
तिला जाणवते की मघाशी एका विधवा स्त्री ने आपल्या
डोक्यावरील कुंकू पुसले. हे आठवताच पळत गेली नि
कुंकू ची डबी उचलून चिमूटभर कुंकू आपल्या भागांत
भरले नि डोक्याला लावले नि स्वतःच्या थोडाडीत मारून
घेत म्हणाली ," क्षमा करा मला. माझ्याकडून नकळत हा
अपराध घडला." असे म्हणून ती त्याला बिलगली.तेव्हा
त्याने तिला आपल्या मिठीत घेतले नि तिच्या पाठीवरून तो आपला हात फिरवू लागला. तशी तिची मिठी अजूनच घट्ट होत गेली. सौंदर्याने आपली मान वर उचलून विवेक कडे पाहत म्हणाली ," तुम्ही जिवंत आहेत हे पाहून मला किती आनंद झाला म्हणून सांगू." तसा विवेक म्हणाला ,
   "  पण तुझा विधवा अवतार पाहून मला  भयंकर राग आला." तेव्हा सौंदर्या दिलगिरी व्यक्त करत म्हणाली,
   " त्या अपराधाची माफी मागितली ना मी तुमची !"
   " हो म्हणूनच माफ केले मी तुला." तेव्हा अचानक सौंदर्याला आठवलं की आपल्या आईला पण ही
खुशखबर द्यायला पाहिजे. " असा विचार करून ती
विवेक ला म्हणाली," तुम्ही एक काम करा आधी कपडे बदली करा बरं. नाहीतर परत सुटेल तुमचं टॉवेल नि
आम्हाला नको ते पाहावे लागेल. म्हणून आधी ते काम करा, तोपर्यंत मी आईला फोन करून  खुशखबर देते." असे म्हणून तिने आपला मोबाईल हातात घेतला नि आपल्या आईचा फोन नंबर डायल करू लागली. पण फोन लागत नव्हता. स्विच ऑफ चा मॅसेज येत होता. तशी ती स्वतःशीच विचार करू लागली की आईचा फोन स्विच ऑफ का लागतोय. ? कुठं गेली असेल आई ? " तेव्हा विवेक बोलला," अगं मोबाईल ची बॅटरीचा डाऊन झाली असेल त्यांच्या."
    " हुं , तेच झाले असेल , नाहीतर माझा कॉल लगेच
रिसिव्ह करते मम्मी !"
    " मग असं करू या का ? म्हणचे आपणच दोघे जाऊन येऊया आईकडून. कसं ?"
    " हां पण आता लगेच  नको.?"
    " का ? काही प्रॉब्लेम ?"
    " हां म्हणजे त्या घरात नसल्या तर !"
    " घरात नसायला काय झालं ? कुठं जाईल ती ह्या क्षणी ?" तेव्हा विवेक आपल्या मनात बोलला की, आता तुला कसं सांगू मघाशी मी तिला महाकाल कडे जाताना पाहिलं म्हणून." असे म्हणून पुढे उघड मध्ये बोलला की,
  काहीतरी कामा निमित्त बाहेर गेली असेल तर !"
   " ह्या वेळी नाही कुठं जात ती. चला जाऊ येऊ पट्कन."
   " बरं बाई चल. तू ऐकायची नाहीस आपलं म्हणणं खरं
केल्याशिवाय ?" असे म्हणून तो तिच्या बरोबर जाण्यास
तयार झाला. ते दोघेही निघणार होते. तेवढ्यात तिथं राधाबाई आल्या नि त्या दोघांकडे पाहत  त्यांनी विचारले,
    "  कुठं जायची तयारी चालली आहे का ?"
    " मी ना, आई कडे जाऊन येते ."
    " आता लगेच नको नंतर जा. आताच तर तो घरी आलाय आपल्या. लगेच बाहेर नको जाऊ !"
    " बरं झालं आई  तू तेवढ्यातच आलीस ती." विवेक
मनात बोलला.
    " ठीक आहे." असे म्हणून ती मागे फिरली. आणि
पुन्हा एकदा आईला फोन लागतो का म्हणून प्रयत्न केला
तर तिच्या आईचाच कॉल आला. तिने लगेच कॉल रिसिव्ह
केला नि म्हटलं,"  हॅलो आई , मी आता तुलाच फोन करणार होते तेवढ्यात तुझाच फोन आला आई !  तुला मी ना  एक खुशखबर देणार आहे मी आई ." तेव्हा तिची आई पण म्हणाली , " अरे वा ! मी पण तुला एक खुशखबर देणार आहे."
    " खरंच का ?"
   " हो ; अगदी खरं !"
   " मग असं कर, तुझीच  खुशखबर काय आहे ती सांग बरं आधी ! "
   " आधी तुझी सांग. "
   " नाही आधी तुझी !"
    " जावई बापू सुखरूप घरी येतील. असं महाराज म्हणाले.
    " अगं आई मी पण तेच सांगणार होते. विवेक परत
आलेत म्हणून."
    " हो का ? बरं बरं !"
   " पण आई तुला कसं कळलं गं ?"
   " महाराजांनी सांगितले."
   " कोणते महाराज ?"
   " अगं तो नाही का ? ज्यांने महाकाल पासून तुला वाचविले होते ."
   " अजय का ?"
   " होय. "
   " पण तो महाराज कधीपासून बनला ?"
  " अगं त्याने महाकाल ला मारलं नाही का ? "
   " बरं पुढे."
    "  महाकाल च्या सर्व सिद्धी  आता त्याला प्राप्त झाल्या. आणि तुला माहितेय त्या महाराजांनीच जावई बापूचा प्राण वाचविला. म्हणून मृत झालेला विवेक पुन्हा जिवंत झाला."
     " मग तर त्यांचे आभारच मानायला पाहिजेत.माझा
विवेक मला परत दिल्याबद्दल."
     " अगं त्यासाठी तर मी गेली होती. म्हणजे मी अगोदर
त्याच्यावर रागावली की महाराज तुम्ही सांगितलंत की
लवकरात लवकर सौंदर्याचे लग्न विवेक शी करा म्हणून.
आणि हे काय घडलं त्यांच्या सोबत." तेव्हा तांत्रिक महाराज म्हणाला," चिंता करू नका. त्या समंध ने त्यांच्यावर चढाई केली होती ; परंतु मी माझ्या शक्तीच्या
जोरावर  त्यांच्या शरीरातून बाहेर पडलेला प्राण पुन्हा
त्याच त्याच शरीरात ट्रान्सफर केला , म्हणून तुमचा जावई
घरी परत आला. वाटल्यास फोन लावून विचारा त्याला हे
खरं आहे का खोटे ?";
    " एकदम खरं आहे आई !'
    " हो का ? मग तर बरंच झालंय की ..... ठेवू का फोन आता ?"
    "  का गं कंटाळलीस आपल्या आईशी बोलायला ?"
    " कंटाळली नाही गं ही खुशखबर विवेक ला पण देते."
    " हां, दे. आणि महाबाळेश्वर ला जायचं कॅन्सल करू
नकोस."
     " का गं ?"
     " महाराज म्हणाले जाऊन येऊ दे त्या दोघांना . आता समंधला अजिबात  घाबरण्याचे कारण नाहीये."
      " असं म्हणतोय होय. बरं सासूबाई ना विचारून पाहते."
      " हां त्यांची संमत्ती फार महत्वाची ! त्या नको म्हणाल्या तर जाण्याचे कॅन्सल करून टाक , उगाच त्यांची
नाराजी नको."
   " ठीक आहे, बघते मी काय कारायचं ते."असे म्हणून फोन कट केला. तेव्हा विवेक ने विचारले ," काय म्हणतात
आमच्या आई साहेब ?" त्यावर सौंदर्या म्हणाली," आई,
म्हणते आता घाबरण्याचे कारण नाही जाऊन या
महाबाळेश्वरला. " तसा विवेक म्हणाला," आई पुन्हा
महाबाळेश्वरला जायला परवानगी देईल असं काही वाटत नाहीये."
    " प्रयत्न तर करून पहा ना, कदाचित देतील ही !"
    " बरं बघतो विचारून." असे म्हणून तो आपल्या
आईला विचारायला तो आपल्या आईच्या खोलीत गेला.
त्यांचा आई ने अगोदर मनाई च केली. मग का कुणास
ठाऊक हनिमूनला जाण्याची परवानगी दिली. तेव्हा ती
म्हणाली," परवानगी देईन परंतु आता एसटी महामंडळाच्या बस ने जा. तरच परवानगी मिळेल." तेव्हा
विवेक म्हणाला ," एसटी महामंडळाच्या बस ने नको.
त्यात मजा नाही येणार. आम्ही आमच्या मोटारी ने जातो
ना ?" त्यावर राधाबाई म्हणाल्या," अजिबात नाही."
विवेक जास्तच गयावया करू लागला तेव्हा नाईलाजाने
त्या दोघांना आपली मोटार घेऊन जायला परवानगी दिली.
पण लगेच त्यांच्या लक्षात आहे, मोटार गॅरेज मध्ये असेल.
हा विचार मनात येताच त्या म्हणाल्या," पण मोटार नेणार
कसा तू ? मोटार तर  गॅरेज मध्ये बनवायला दिली आहेस ना ?" तेव्हा विवेक म्हणाला," झाली ती कधीच रिपेअर !
घेऊन येतच असेल तो गॅरेज वाला."
    " झाली असेल रिपेअर तर जा घेऊन ; पण जरा सांभाळून चालव बरं का ?"
    " ओके !" विवेक उद्गारला आणि खरोखरच मोटार एकदम दारात येऊन उभी राहिली. गॅरेज वाला मोटारीची किल्ली देऊन गेला. पण गैरेंज वाला नेहमीचा ओळखीचा नव्हता. कोणीतरी अनोळखी होता. म्हणून विवेक च्या वडिलांनी विचारले," तू नवीन लागलास का कामाला ?"
तो मुलगा म्हणाला ," हो , आजच लागलोय." असे म्हणून त्याने गोपाळरावांच्या हातात किल्ली दिली नि तो निघूनच गेला. त्यामुळे त्याला विचारायचे राहून गेलं की तुला आमच्या घरचा पत्ता कसा सापडला. पण तो थांबलाच नाही. म्हणून ते स्वतःशीच पुटपुटले की, कमाल आहे, आजकालच्या मुलांची पत्ता बरोबर शोधून काढतात. इतक्यात तेथे विवेक येऊन म्हणाला," पप्पा , हे विज्ञान युग आहे, इथं कसं सर्वकाम झटपट व्हायला पाहिजे.इथं मोबाईल नंबर डायल करा लगेच अमेरिकेत कॉल लागतो की नाही ? पूर्वी पत्र पोहोचायला किती दिवस लागायचे ? महिना किंवा त्याही पेक्षा जास्त अवधी लागायचा ? पण आता तसं आहे का ? नाही ना ?"
    " खरंय बाबा तुझं. !"असे म्हणून त्याच्या हातात किल्ली देत बागेतील फुल झाडांना पाणी द्यायला गेले.
     
  रात्री जेवणं आटोपली नि प्रत्येक जण झोपण्यासाठी आपापल्या खोलीत निघून गेले. सौंदर्या मात्र अजूनही
किचनमध्येच काम करत होती. झटपट सर्व कामे उरकून ती आपल्या बेडरूम मध्ये आली नि  पाहते तर काय ती येईपर्यंत विवेक झोपून ही गेला. खरं तर  आज तिच्या मनात मधुचंद्र साजरा करायचा होता. पण विवेक झोपी गेला. तिच्या मनात एक विचार आला की उठवू का ह्याला ? पण लगेच मनात दुसरा विचार आला की , नको. झोपला आहे तर झोपू दे. उगाच झोपमोड होईल त्याची !
असा विचार करून तिने विजेचे बटन ऑफ केलं. नि त्याच्या शेजारी झोपली. रात्रीचा बाराचा सुमार असावा. अचानक तिच्या पाठीवर कोणाचा तरी स्पर्श जाणवला.
परंतु हा स्पर्श तिच्या परिचयाचा होता. तिला वाटले की
आज ही महाकाल आला की काय म्हणून तिने पटकन
आपली कुश बदलली. तर स्पर्श विवेकचा होता.हे तिला
जाणवलं. पण असं होऊ शकते दोघांचा एक सारखाच
स्पर्श कसा काय ? कदाचित माझ्या समजण्यात चूक
झाली असावी. अशी तिने आपल्या मनाची समजूत घातली. अगोदर त्या स्पर्शाने ती भयभीत होऊन उठायची.
परंतु आता तोच स्पर्श तिला हवाहवासा वाटू लागला होता.
तिच्या सर्वांगावरून त्याचा हात फिरत होता. तशी ती
उत्तेजित होत होती. तिच्या मानेवर त्याच्या नाकातील गरम श्वास तिला अजून बेहाल करत होते. इतक्यात त्याने तिच्या तोंडात आपले तोंड घातले नि तिचे ओठांचे रस
तो पिऊ लागला. तिच्या ओठांचे तो दीर्घ चुंबन घेऊ लागला. तेव्हा तिने आपले डोळे गच्च मिटून घेतले. त्यानंतर तिच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाना तो आपल्या ओठांनी चुंबीत होता. त्याच्या प्रत्येक चुंबनासरशी तिच्या अंगावर मोरपीस फिरत असल्याचा भास होई तिला. ती भान हरपून गेली. आता त्याने तिच्या सर्वांगाचा ताबा घेतला होता. ती आता जास्तच उत्तेजित झाली होती. त्यामुळे तीही त्याला आता प्रतिसाद देऊ लागली होती. तिच्या तोंडून बाहेर पडणारे उसासे त्याला जास्त बेहाल करत होते. त्याच्या प्राणयक्रीडेमध्ये ती एकदम धुंद झाली होती. शेवटी परमोच्च बिंदू गाठता क्षणीच दोघांची शरीरे तृप्त होऊन शांत झाली. ती त्याच्या कुशीत झोपली. तशी त्याच्या शरीरातून एक काळी आकृती बाहेर पडली. नि
बिकट हास्य करत म्हणाली मैं हूँ  महाकाल और
महाकाल जो चाहता है ,वो पाकर ही दम लेता है । आ हा हा हा असे विकट हास्य करतो नि क्षणात गायब होतो.

    क्रमशः



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३५ | Mahabharat part 135 | Author : Mahendranath prabhu.